EVM (ईव्हीएम) मशीन  विरोधात घुग्घूस ते चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यलया पर्यंत पदयात्रा संपन

43

EVM (ईव्हीएम) मशीन  विरोधात घुग्घूस ते चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यलया पर्यंत पदयात्रा संपन


EVM हटाओ,देश बचाओ,असे घोषणा देत घुग्घुस ते चंद्रपुर जिल्हाधिस कार्यलय पोहोचले


घुग्घूस : ईव्हीएम मशीन ( EVM ) विरोधात घुग्घूस शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत
घुग्घूस काँग्रेस कमेटी व सामाजिक संघटनेच्या वतीने लोकशाही बचाव पदयात्रा ही दिनांक 23 डिसेम्बर 2024 रोजी काढण्यात आली
सदर पदयात्रा सकाळी 09 वाजता घुग्घूस येथून निघाली व सांयकाळी 05 वाजता जिल्हाधिकारी कार्यलयात पोहचली त्याठिकाणी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन महाराष्ट्रात होणाऱ्या महानगर पालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदेसह सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्या ही मागणी करण्यात आली
सदर पदयात्रा ही काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वात काढण्यात आली तर पदयात्रेत पडोली येथून खासदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रितेश ( रामू तिवारी),विनायक बांगळे,प्रवीण पळवेकर, के. के सिंग, एन. एस. यु. आय जिल्हाध्यक्ष शफक शेख,राजेश अड्डूर, महिला जिल्हाध्यक्षा सुनंदा धोबे, दिपक मित्रा, सुधाकर बांदूरकर, कल्याण सोदारी हे सहभागी झाले
आंदोलनकर्ते हातात तिरंगा घेऊन इलेकशन कमिशन हाय – हाय
सांग सांग निवडणूक आयोग मला
माझं मत कुणाला गेला?
इव्हिएम हटाव देश बचाव अश्या घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत गेले.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत कुठलीच लहर नसतांना अविश्ववसनीय पद्धतीने भारतीय जनता पक्ष व महायुती जिंकून आली.

निवडणुकीत अनेक ठिकाणी झालेल्या मतदानात व मोजल्या गेलेल्या मतदानात प्रचंड तफावत दिसून आल्याने मतदारांचा या मशिनवर विश्वास राहिलेला नाही.

लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी देशातील निवडणुका या पारदर्शक होने अंत्यन्त महत्वाचे आहे मतादारांना आपला मत आपण दिलेल्या उमेवारालाच मिळाला याचा विश्वास असणं आवश्यक आहे.
देशातील EVM अर्थात Electronic Voting Machine ही सत्ताधारी पक्षासाठी Electronic Victory Machine झाल्याचे चित्र देशभरात दिसत आहे.

शेतमालाला उत्पादन खर्चाचा निम्म्याहुन कमी भाव, शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा जसे खते, बियाणे, कीटकनाशके, तणनाशके, मजुरी, ट्रॅक्टर, मोटार सायकल,टायर, पाईप, डिजल पेट्रोल, वैरण, ढेप, मोबाईल, डेटा, सर्वच वस्तू महागल्या उद्योगधंदे बंद पडलेत? राज्यात लाखो सुशिक्षित बेरोजगार आहे, सरकारने हजारो सरकारी शाळा बंद केल्या गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर हल्ला केला राज्यातील उद्योगधंदे गुजरातला पळविले इतकी विषमता असतांना केवळ लाडक्या बहिणीच्या आड हे कटकारस्थान रचण्यात आलेला आहेत.

जगातील 195 पैकी केवळ पाच ते दहा देशच इव्हिएमचा वापर करतात अमेरिके जर्मनी, ब्रिटेन सारख्या प्रगत देशातील निवडणुका ही बॅलेट पेपरवरच होत असतात अनेक देशांनी इव्हिएमचा वापर केला व ते असुरक्षित वाटल्याने परत बॅलेटचा वापर शुरु केला.
भारतातील सर्वोच्च न्यायालयातील बुद्धीवंत वकीलांचा समूह,जगातील प्रसिद्ध वैज्ञानिक एलन मस्क हा सुद्धा इव्हिएम मशीनचा विरोध करतोय लोकशाहीत जनता ही सर्वोच्च असे मानले जाते मग जनतेचा विरोध असतांना निवडणूक आयोगाला व भाजपाला इव्हिएमचा इतका पुळका कशासाठी? असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी केला आहेत

जर इव्हिएम मध्ये घोळ शक्य नसेल तर इव्हिएमची जबरदस्ती कशासाठी?
होऊ द्या निवडणुका बॅलेटवर!
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगितेत सांगतात ‘गाव हा विश्वाचा नकाशा “
गावावरून देशाची परीक्षा अर्थात गावावरून देशाची परिस्थिती माहित होते ” मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चातून सत्य तपासण्यासाठी बॅलेटवर निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीस बळावर बॅलेटवरची निवडणूक होऊ दिली नाही उलट त्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले
देशात लोकशाही असतांना ही दडपशाही कशासाठी असं काय बाहेर आलं असतं जे सरकारने येऊ दिले नाही?
हे सरकारची दडपशाही स्पष्ट करीत आहे की इव्हिएम मुळेच यांचे सरकार सत्तेत येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

सदर पदयात्रेत काँग्रेस नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते नारायण ठेंगणे, शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख,माजी उपसरपंच हनिफ शेख,कल्याण सोदारी,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अध्यक्ष दिलीप पिट्टलवार, शरद कुमार,सत्यनारायण डकरे, पांढरकवढा माजी सरपंच सूरज तोतडे,
शेख शमिउद्दीन, तालुका सचिव विशाल मादर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख,श्रीनिवास गुडला तालुका उपाध्यक्ष,शेखर तंगडपल्ली,विजय माटला,एन. एस. यु. आय अध्यक्ष आकाश चिलका, मोसीम शेख,ताज अस्लम,सुनील पाटील, दिपक पेंदोर, निखिल पुनघंटी,अरविंद चहांदे, दिपक कांबळे,कुमार रुद्रारप, अभिषेक सपडी,थामस, बालकिशन कुळसंगे,चिरंजीव मेडशेल्ली, जाफर शेख,शेणगाव काँग्रेस नेते भास्कर सोनेकर, गौरव ठावरी,शहशाह शेख,अर्नाकोंडा,देविदास पुनघंटी,अनुग्रह मायकल,सुरज ठावरी,सचिन नागपुरे, कपिल गोगला,साहिल आवळे, अंकुश सपाटे, तन्मय गहुकार,महिला नेत्या शालिनीताई भगत,महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, महिला शहर अध्यक्ष संगीता बोबडे, शहर कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के,जिल्हा सचिव दुर्गा पाटील, जिल्हा सचिव मंगला बुरांडे,
संध्या मंडल, पूनम कांबळे, शिल्पा गोहील, प्रीती तामगाडगे, माधुरी सुटे,वैशाली दुर्योधन,भाविका आटे,सरस्वती कोवे,आरती कैथल, सरस्वती पाटील, अर्चना परचाके,व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here