युवा प्रशिक्षणार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकळे
तहसीलदार आणि गटविकास अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
(तालुका प्रतिनिधी)
भद्रावती, दि.०८ : युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रशिक्षणार्थ्यांनी तहसीलदार भद्रावती आणि गटविकास अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या उपक्रमामुळे आपल्या राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत सर्व शिकावू प्रशिक्षणार्थी विविध विभागातील शासकीय कार्यालयातील आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी म्हणून निवड केली आहे. सर्व प्रशिक्षणार्थी रुजू सुद्धा झालेले आहेत. प्रशिक्षणार्थ्यांना कामाचा अनुभव, मार्गदर्शन शिक्षणाद्वारे मिळत आहे. परंतु शिक्षणाचा कालावधी हा फक्त ०६ महिनेच असून फेब्रुवारी २०२५ मध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थी सहा महिन्यानंतर करणार तरी काय? असा प्रश्न सर्व प्रशिक्षणार्थीना पडला आहे. सर्व प्रशिक्षणार्थी पूर्णपणे बेरोजगार होणार असल्याकारणाने चिंता भेडसावत आहे.