निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या कामाला उपमुख्यमंत्र्यांनी दिली स्थगिती
- खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याला अखेर यश.
यवतमाळ : जिल्ह्यातील निम्न पैनगंगा प्रकल्पाल अनेक गावकऱ्याचा गेल्या 27 वर्षापासून कडवा विरोध असून देखील या विरोधाला न जुमानता राज्य सरकारने काम सुरु केले होते.
या संदर्भाने निम्न पैनगंगा प्रकल्प विरोधी समिती द्वारा खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांना आमदार असतांना हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती. खासदार धानोरकर यांनी त्यांच्या आमदारकीच्या कालावधीत नागपूर हिवाळी अधिवेशनात सभागृहात या संदर्भात विषय मांडला होता. तसेच मागील अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक घेऊन सदर प्रकल्पातील उणिवा अधिकाऱ्यांसमक्ष मांडून सदर प्रकल्पाबाबत योग्य निर्णय घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती व अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन प्रकल्पातील कामाला तात्पुरती स्थगीती दिली. त्यासोबतच विविध उपाययोजनांचा अभ्यास करुन अहवाल येई पर्यंत कुठलेही काम सुरु करु नये अशा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यवतमाळ जिल्ह्यातील निम्न पैनगंगा प्रकल्पाला जवळपास 45 गावातील नागरिकांनी विरोध दर्शविला होता. अनेक गावे पेसा अंतर्गत असल्याने या प्रकल्पाकरीता ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक असतांना कुठलीही परवानगी न घेता सदर प्रकल्प पुर्ण करण्यात येत असल्याचा आरोप गावकऱ्यानी केला होता.
त्यासोबतच सदर प्रकल्प तयार करतांना गावकऱ्यांचा पुनर्वसनाचा, आर्थिक मोबदला त्यासोबतच अनेक समस्यांचा सामाना गावकऱ्यांना करावा लागणार होता. त्यामुळे गावकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध करुन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या कडे न्याय मागितला. खासदार धानोरकर यांनी विधानभवन येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सदर प्रकल्पासंदर्भाने चर्चा केली व गावकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. यासंदर्भांने विधानभवन येथे 9 जुलै रोजी बैठकीचे आयोजन करुन प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या न्याय मागण्यांचा आढावा घेतला व जोपर्यंत या प्रकल्पातील विविध उपाययोजनांचा अभ्यास होणार नाही तोवर या प्रकल्पातील कुठलेही काम न करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या निर्णयाने प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या लढ्याला यश मिळत असल्याचे दिसून येत असुन बुडीत क्षेत्रातील नागरीकांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे यासंदर्भात आभार मानले आहे.
