घुग्घूस – गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात पावसाची झळ लागली असून वर्धा नदीला महापूर आलेला आहे यामुळे धानोरा – गडचांदूर मार्गांवरील पुल नदीच्या पाण्याखाली बुडाल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे नदीच्या दोन्ही बाजूला ट्रॅक हायवा सारख्या वाहनांची रांगच – रांग लागलेली आहे या वाहनवरील चालक व मदतनीस हे या पुरात अडकल्याने त्यांना खाण्या पिण्याचा मोठा त्रास भोगावा लागत आहे नदी परिसरातील अनेक गावाना पुराचा फटका बसल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे
नदी परिसरात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना होऊ नये याकरिता घुग्घूस पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के यांनी पूल परिसरात पोलिसांची तैनाती शुरु केली आहे
सदर पुलाची उंची अगदी कमी असल्याने सदर पूल हा वारंवार बंद पडत असतो गेल्या पावसाळ्यात हा पूल सात वेळा बंद झाला होता नागरिकांना वारंवार होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी सदर पुलाची उंची वाढविण्याची मागणी काँग्रेस नेते सैय्यद अनवर यांनी केली आहे