पांढरकवडा येथे भीषण पाणी टंचाई काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्यातर्फे टँकर द्वारे पाणी पुरवठा
घुग्घूस : शहारा लगत असलेल्या वड़ा- पांढरकवडा गावात गेल्या अनेक दिवसापासून ग्राम पंचायतचे नळ कनेक्शन खंडित झालेले आहेत. वढा नदीपासूनच मोटर खराब झाल्याने संपूर्ण गाववासी पाण्यासाठी पायपीट करीत आहेत. ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपल्याने सरपंच सूरज तोतडे हे सरपंच पदावरून पायउतार झालेले आहेत ते पदावर असतांना गावासाठी भांडून पाण्याची व्यवस्था करीत होते मात्र आता ग्रामसेवकाकडे कारभार असल्याने गाव पाण्यापासून वंचित झाले आहेत.
पांढरकवडा येथील नागरिकांची पाण्याची समस्या व अडचण लक्षात घेऊन काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी हे पांढरकवडा वासियांच्या मदतीला धावून आले व त्यांनी वॉटर टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केलेली आहे जिल्हा प्रशासनाने तातळीने या गंभीर समस्याकडे लक्ष देऊन पाणी टंचाई सोडवावी अशी मागणी रेड्डी यांनी केली आहे