चिमूर येथे श्रीहरि बालाजी महाराजाची घोडरथ याञा असल्यांने वाहतुक व्यवस्थेमध्ये बदल
चिमुर, : दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी मौजा चिमुर जि. चंद्रपुर येथे दरवर्षी प्रमाणे श्रीहरी बालाजी महाराज घोडारथ यात्रा असल्याने सदर यात्रेकरीता मोठ्या प्रमाणात भावीकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१ च्या कलम ३३(१) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व नियमणासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारान्वये आम्ही मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपुर सदर मार्गावर वाहतुक सुरळीत चालावी, वाहतुकीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास अगर गैरसोय होऊ नये म्हणुन वाहतुक
व्यवस्थेमध्ये पुढीलप्रमाणे बदल करणेबाबत अधिसुचना निर्गमीत करण्यात येत आहे.