सरदार पटेल मेमोरियल सोसायटी द्वारा संचालित राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे सद्भावना दिवस आयोजित.
चंद्रपुर : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व राजीव गांधी यांची दि. २९ मे रोजी पुण्यतिथी आहे. हा दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रात भारताला ताकदवान व सामर्थ्यशाली बनविण्याचे स्वप्न स्व. राजीव गांधी यांनी पहिले आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी धोरणात्मक निर्णयही घेतले. भारतास संगणक युगात पोहोचविणारा पंतप्रधान अशी त्यांची ओळख आहे. तंत्रज्ञानाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकाला मिळावा आणि त्यातून विकास साधण्याचा विचार हे त्यांचे द्रष्टेपण होते. या महान व्यक्तिमत्वाची स्मृती जपणे हि केवळ एक औपचारिकता नाही तर त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांनाचाही सन्मान आहे
अशा या महान व्यक्तिमत्वाच्या स्मृती जपण्याकरिता स्व राजीव गांधींना श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे देशाप्रती योगदानाचे कृतज्ञापूर्वक स्मरण करण्यासाठी राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बुधवार दि. २१ मे २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता सद्भावना दिवसाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रसंगी या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकरराव भावे यांची उपस्थिती लाभणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे, संस्थेचे सचिव जयंत वेलंकीवार, कोषाध्यक्ष, निनाद गड्डमवार, संस्थेचे सन्माननीय सदस्य शफिक अहमद, प्रशांत पोटदुखे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल चिताडे यांची उपस्थिती राहणार आहे.
भारतरत्न स्व राजीव गांधी यांचा संपूर्ण जिल्ह्यात एकमेव पुतळा महाविद्यालयाच्या प्रांगणात स्थापित करण्यात आलेला असून स्व राजीव गांधी यांच्या पुतळ्यास सर्व उपस्थितांद्वारे माल्यार्पण करून आदरांजली वाहन्यात आल्यानंतर मुख्य कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्रांगणातील छोटूभाई पटेल सभागृह येथे होणार आहे.
या कार्यक्रमात आपण आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विनोद दत्तात्रेय यांनी केले आहे.