-बल्लारपूर पोलिसांनी एका मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश करत, २.५९ लाख रुपयांच्या चोरीचा छडा लावला आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांकडून चोरी गेलेल्या मुद्देमालाच्या मूळ किमतीपेक्षा अधिक, म्हणजेच ८.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बल्लारपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसीय सूत्रानुसार १४ मे २०२५ रोजी पहाटे ३ ते ३:२० च्या सुमारास, बल्लारपूर येथील जुन्या डब्लू सी एल क्वॉर्टर क्रमांक ०४ मध्ये राहणारे स्वामी हर्ला बानोत (वय ३५) यांच्या घरात तीन अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकला. यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २,५९,०००/- रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. या घटनेनंतर बल्लारपूर पोलीस ठाण्यात कलम ३३१ (४), ३०९ (४), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. —--बॉक्स—- सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपी गजाआड या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, बल्लारपूर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तात्काळ वेगवेगळ्या टीम तयार केल्या. विशेषतः सायबर पोलीस स्टेशन, चंद्रपूरने या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. सायबर टीमने दिलेल्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर, पोलिसांनी जलद गतीने तपास करत आरोपींचा छडा लावला. —–बॉक्स—- आरोपींना अटक आणि घसघशीत मुद्देमाल जप्तपोलिसांनी या प्रकरणात मनिष जगदिश रप्तान (१९, रा. साईबाबा वार्ड, बल्लारपूर), प्रिन्स उर्फ कालु संग्राम बहुरीया (१९, रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारपूर) या दोन आरोपींना, तसेच तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक केली आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून आजच्या सराफा मुल्यांकनानुसार ७,४३,०००/- रुपयांचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल (किंमत अंदाजे ८०,०००/- रुपये) असा एकूण ८,२३,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढल्याने, या प्रकरणात आता भारतीय न्याय संहिता कलम ३१० (दरोडा) हे कलम वाढवण्यात आले आहे. ——बॉक्स—- *पोलीस दलाचे कौतुकास्पद कार्य* ही कौतुकास्पद कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु मॅडम, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा, श्री. सुधाकर यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.यात सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक श्री. निशिकांत रामटेके, सहायक पोलीस निरीक्षक श्री. बलराम झाडोकर, पोलीस शिपाई कार्तिक आणि सायबर पोलीस स्टेशनची संपूर्ण टीम यांचे मोठे योगदान आहे.बल्लारपूर पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे, डी बी शाखेचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत भोयर, सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, सफौ. आनंद परचाके, पोहवा. रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडित, सुनील कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, पो. अंमलदार शरदचंद्र कारुश, वशिष्ठ रंगारी, मिलिंद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, चंद्रशेखर माथनकर, भास्कर चिचवलकर, सचिन राठोड, विकास जुमनाके आणि म.पो. अंमलदार अनिता नायडू या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत कुशलतेने आणि समन्वयाने काम करत हा गुन्हा उघडकीस आणला. त्यांच्या या कामगिरीमुळे बल्लारपूर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.