नितेश केराम गडचांदूर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बचू कडू यांनी शेतकऱ्यांनसह दिव्यांक आणि विधवा महिलांच्या प्रश्रसंदर्भात आपल्या मागण्यासाठी गेल्या 6 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनाचा शस्त्र उगरला आहे आंदोलनाबाबत सरकारकडून कोणतेही पाऊले उचलली जात नसल्याने आता प्रहारचे कार्यकर्ते राज्यभर आक्रमक होताना दिसत आहे .
इतर ठिकानांसह कोरपना तालुका येथील गडचांदूर शहरात देखील सरकारच्या विरोधात प्रहारचे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांच्या नेतृत्वात पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन करण्यात आला .
यावेळी कोरपना तालुका प्रमुख विनोद शिंदे सतीश शेरे मनोज जरांगे पाटील समर्थक अभिमन्यू चव्हाण प्रफुल देवलकर इसाक बेग गजानन पेंदोर अनुप राखूडे सामाजिक कार्यकर्ते दिनेश राठोड महादेव बेरड निलेश यांच्यासह प्रहार कार्यकर्तेची उपस्थिती होती यावेळी शासनाच्या विरोधात व बचू कडूच्या समर्थनार्थ जोरदार घाषणाबाजी करण्यात आली.
मागील 6 माहिन्या पासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना नादी लावण्याचे काम करत आहे बचू कडू शेतकऱ्यांना अपंगांच्या विविध मागण्यासाठी अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत त्याचा सरकारने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना सम्पूर्ण कर्जमाफी द्यावी अन्यथा यापुढे तीव्र स्वरुपाचा आंदोलन करणार असा इशारा प्रहारचे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांनी दिला आहे.