एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांना उर्जानगर मित्र परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली
चंद्रपुर:
अहमदाबाद येथे नुकतीच झालेली एअर इंडिया विमान दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक घटना ठरली. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध प्रवाशांच्या सन्मानार्थ उर्जानगर मित्र परिवार यांच्यावतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या भावनिक प्रसंगी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मा. श्री. विजय राठोड साहेब व उपमुख्य अभियंता मा. श्री. शाम राठोड साहेब यांनी उपस्थित राहून मृतात्म्यांना आदरांजली अर्पण केली.
सरांनी आपल्या मनोगतातून या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. “ही दुर्घटना केवळ संबंधित कुटुंबियांनाच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी धक्कादायक आहे. मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून आपण त्यांच्या दुःखात सहभागी होतो. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी यंत्रणांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
उपस्थितांनी दोन मिनिटे शांतता पाळून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे संयोजन उर्जानगर मित्र परिवाराने अत्यंत सजगतेने व भावनिक वातावरणात पार पाडले..