भद्रावतीत शाळा परिसरातून मुले उचलणारी टोळी सक्रीय
हि अफवा असून अशी कोणतीही घटना न घडल्याचे स्पष्ट
(तालुका प्रतिनिधी)
भद्रावती, दि.०३ : शहरातील केंद्रीय विद्यालय तसेच ऑर्डनन्स फॅक्टरी उच्च माध्यमिक शाळा परिसरात मुले उचलणारी टोळी आल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली. यामुळे शहरातील प्रत्येक पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. शाळांनी देखील प्रत्येक वर्गाच्या ग्रुपवर मॅसेज पाठवून काळजी घेण्याचे मॅसेज पाठविले.
परंतू ही घटना अफवा असून अशी घटना घडलीच नाही असे केंद्रीय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, ऑर्डनन्स फॅक्टरी उच्च माध्यमिक विद्यालय, चांदा चे मुख्याध्यापक आणि ठाणेदार भद्रावती यांनी माहीती दिली.
काय होता मॅसेज :
“सूचना – गेल्या ०२ दिवसांपासून काही अज्ञात पुरूष महिलांसह शाळा सुटल्यानंतर केव्ही शाळेत येत आहेत आणि मुलांना चॉकलेट देऊन आमिष दाखवत आहेत आणि सांगत आहेत की तुमचे पालक तुम्हाला घ्यायला येत नाहीत आणि त्यांनी आम्हाला तुम्हाला सोडायला पाठवले आहे. ही घटना माझ्या एका आयईएसच्या मुलीसोबत घडली. पण त्याची मुलगी हुशार होती आणि तिने नकार दिला. ही बाब व्यवस्थापनाला सांगण्यात आली आहे. जे मुले केव्ही आणि ओएफ शाळांमध्ये शिकत आहेत त्यांनी कृपया त्यांच्या मुलांना सतर्क करावे.”

चौकट :