बिरसा मुंडा यांचा उलगुलान जल, जंगल जमिनीसाठी होता – ऍड. अरविंद सिडाम

57
 बिरसा मुंडा यांचा उलगुलान जल, जंगल जमिनीसाठी होता – ऍड. अरविंद सिडाम
 राजूर येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या स्मृती दिनाला अभिवादन
__________________
वणी : ” बिरसा मुंडा यांना वयाच्या २५ व्या वर्षी इंग्रजांनी विष देऊन संपविले. परंतु त्यांच्या संघर्ष हा निव्वळ इंग्रजां विरोधातच नव्हता तर त्यांची खरी लढाई ही या देशातील मूळ निवासियांच्या जल, जंगल व जमिनी वरील हक्कांचा होता.” असे प्रतिपादन राजूर कॉलरी येथील शहिद विर बिरसा मुंडा नगरातील बिरसा मुंडा चौकात झालेल्या कार्यक्रमात आदिवासी युवा जनजागृती संघटनेचे नेते ऍड . अरविंद सिडाम यांनी केले.

बिरसा मुंडा नगरात झालेल्या या क्रांतिवीर बिरसा यांच्या स्मृती दिनानिमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ” क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या संघर्षातील जल, जंगल व जमिनीचे प्रश्न सध्या जास्त तीव्र झाले आहे. सत्ताधाऱ्यांकडून देशातील नागरिकांचे ह्या मूलभूत अधिकारांवरील हक्क हिरावून घेण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असून जल, जंगल व जमीन भांडवलदारांच्या घश्यात घालण्याचे महापाप करीत आहे. ह्या विरोधात कधी नव्हे तेवढा संघर्ष वाढला आहे. आज क्रांतिवीर बिरसा यांना अभिवादन करताना जनतेला हक्काचा समान असलेला वाटा मिळत नाही तोपर्यंत बिरसा यांचा उलगुलान पूर्ण होणार नाही.”

या झालेल्या स्मृतिदिन चे कार्यक्रमाला नगरातील स्त्री पुरुष व युवा मोठ्या संख्येने उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here