*नाट्यश्री कविता स्पर्धेतील चोविसाव्या सत्रात स्वप्नील बांबोळे विजयी*
——————————————
*गडचिरोली* :
स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने *”आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता* ” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला *”आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी”* म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे चोविसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २३ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कवी स्वप्नील बांबोळे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “उमेद” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
स्वप्नील बांबोळे हे मौजा- मुरमाडी (जिल्हा- गडचिरोली) येथील रहिवासी असून नवोदित कवी आहेत. शंभरावर कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे. अनेक वृत्तपत्रांतून त्याच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत. नुकत्याच नाट्यश्री तर्फे प्रकाशित झालेल्या “रानगर्भ फुलत आहे” या प्रातिनिधिक कविता संग्रहात त्यांच्या दोन कविता प्रकाशित झालेल्या आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या चोविसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने वंदना सोरते, नरेंद्र गुंडेली, तुळशीराम उंदीरवाडे, पुरुषोत्तम ठाकरे, स्वप्नील बांबोळे, अजय राऊत, माधुरी अमृतकर, संगीता ठलाल, पुनाजी कोटरंगे, मुरलीधर खोटेले, गजानन गेडाम, पी. डी. काटकर, गणेश रामदास निकम, चंद्रकांत लेनगुरे, प्रेमिला अलोने, संतोष कपाले, डॉ. मंदा पडवेकर, विलास जेंगठे, मधुकर दुफारे, भिमानंद मेश्राम, सुरज गोरंतवार, सुजाता अवचट इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

– *चुडाराम बल्हारपुरे* (नाटककार)