नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाह तूक सिग्नलची गरज इंजि जगदीश लवाडिया यांचे आमदार करंजी देवतळे यांना निवेदन
नितेश केराम भद्रावती शहरातील मुख्य प्रवेशद्रार बाळासाहेब ठाकरे चौक बस स्थानक चौक तसेच वरोरामधील आनंदवन चौक व रत्नमाला चौक येते दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांच्या संखेमुळे वाहतुकीचा गोंधळ निर्माण होत आहे या चौकांमध्ये जड वाहने मोठया प्रमाणात प्रवास करीत असल्यामुळे अपघातांची शक्यता वाढत आहे इंजि लवाडिया यांनी निदर्शनास आणून दिले की दिनांक 28/03/2024 रोजी भद्रावतीतील बाळासाहेब ठाकरे चौकात घडलेल्या भीषण अपघातात एक नागरिकाचा मृत्यू झाला आणि अशा घटणा पुन्हा घडू नयेत यासाठी तात्काळ सिग्रल यंत्रणा बसविणे आवश्यक आहे मागण्या पुढील प्रमाणे 1)संबंधित चॊकांमध्ये वाहटूक सिग्रुल बसविण्यात यावेत 2)वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची नियुक्ती करावी 3) जागोजागी सावधानता फलक व साइनबोर्ड लावावेत हा प्रस्ताव मान्य करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्वरित उपयोजना करण्यात याव्यात अशी अपेक्षा इंजि जगदीश लवाडीया त्यांनी केली