नितेश केराम गडचांदूर – शहरातील मान्सूनपूर्व नाल्यांची तातडीने सफाई करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे रोहन काकडे यांनी नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्रारे केली आहे. सध्या नगरपरिषदे मार्फत स्वच्छ शहर अभियान राबवले जात असेल तरी प्रत्यक्ष पाहणीअंती अनेक ठिकाणी नाल्यांची सफाई न झाल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे परिसरात मोट्या प्रमाणात अस्वछता पसरली असून नागरिकांना आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर पुरस्थिती निर्माण होते आणि पाणी घरोघरी शिरून जनतेच्या मालमतेचे मोठे नुकसान होते विशेष गरीब वस्तीत नागरिकांना फटका बसतो या पार्शभूमीवर आगामी पावसाळा लक्षात घेता नाल्यांची तात्काळ व प्रभावी सफाई करून नागरिकांचे आरोग्य आणि संपतीचे संरक्षण करण्यासाठी नगरपरिषदे कोणतीही हलगजीपणा न करता त्वरित पावले उचलावीत अशी मागणी निवेदनाद्रारे करण्यात आली आहे.