Home Breaking News MSEB, चंद्रपूर येथे मोठ्या अधिकार्यांचे कालावधी संपल्यानंतर ही का होतं नाही बदल्या..!

MSEB, चंद्रपूर येथे मोठ्या अधिकार्यांचे कालावधी संपल्यानंतर ही का होतं नाही बदल्या..!

126
*MSEB, चंद्रपूर येथे मोठ्या अधिकार्यांचे कालावधी संपल्यानंतर ही का होतं नाही बदल्या..!*
*कोणाच्या फाईद्या करीता होतं आहेत, हे प्रकरण

चंद्रपूर -MSEB , सेवा नियमानुसार कालावधीच्या नियमांचे उल्लंघन करून कर्मचारी एकाच कार्यालयात व एकाच विभागात असल्यामुळे, ठेकेदारांचे संबंधित अधिकाऱ्यांशी जास्तीत जास्त संबंध वाढलेले दिसत असल्यामुळे या अधिकाऱ्यांकडून अधिक कंत्राटीदार मालामाल होण्याच्या मार्गाकडे ओळत असल्याचे चित्र समोर आलेले आहे, आट ते दाहा वर्षापासून वरिष्ठ अधिकारी एकाच पदावरती कार्यरत असल्यामुळे संबंधित व एकच विभागात, असल्याने कंत्राटीदारांचे संबंध वाढलेले आहे,

या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करायला गेले असता अधिकारी उडवा उडवी ची भाषा करीत आहेत, या व अधिकाऱ्यांवरती वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष व नियंत्रण नसल्याची बाब सामोर येत आहे, या अधिकाऱ्यांना अधिक पैसे कमावण्याचा मोह लागलेला असून, वरिष्ठ अधिकारी व कंत्राटीदार मिळून एम एस ई बी चंद्रपूर महाऔष्णिक, ला खोकला करण्यामागे लागलेले आहेत.

अनेक मागील काळात एम,एस,ई,बी, ने वेगवेगळ्या प्रकारचे टेंडर काढले आले परंतु अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारांशी साठ घाट करून संबंधितच व मोठ्या कंत्राटदाराला टेंडर दिलेले आहेत, यामुळे छोट्या व बाकी कंत्राटदारांचे मोठे नुकसान होत आहेत व ईतर कंत्राटदारांना एम,एस,ई,बी,मध्ये काम करण्याची संधी मिळत नाही आहे, या,अधिकाऱ्यांमुळे अनेकांचे नुकसान झालेले आहे यामुळे संबंधित कामगार छोटे मोठे कंत्राटीदार व मोठ्या प्रमाणात महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर चे नुकसान केलेले आहे संबंधित अधिकाऱ्यांमुळे कंत्राटदाराचे एम,एस,ई,बी,चे,व अनेक काही लोकांचे नुकसान होत असेल तर त्वरित अधिकाऱ्यांचे ट्रान्सफर का केले जात नाही..!

 

विवादीत असलेले तसेच इतरांशी संघमती ठेवलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची योग्य पद्धतीने चौकशी करून कारवाई व बदली करण्याची मांगणी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यानी MSEB प्रशासनाडुन केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here