शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी अनिवार्य :- नितेश कोराम
कोरपणा : शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी शासनाद्रारे राबविण्यात येणाऱ्या योजने अनर्गत शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी घेणे आवश्यक करण्यात आले असून मंगळवार दि 15 एप्रिल पासून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी ओळपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आले असल्याचे तालुका प्रशासकीय अधिकारी यांच्या कडून कळविण्यात आले आहे. राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणाम कारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने आज राज्यात योजना राबविण्यात येत आहे .
या योजने अनर्तग राज्यातील सर्व शेतकऱ्यांना व त्यांच्या आधार संलग्न माहिती संच ( फार्मर रजिस्ट्री ) शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच क्रॉप सोन रजिस्ट्री व शेतांचे भू सं दभिकृत जिओ रेफरन्स ल्यण्ड पार्सल यांचा माहिती संच एकत्रि तरित्या तयार करण्यात येत आहेत.
त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकारी अभिलेखा तील शेतकऱ्यांची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक ( फार्मर आयडी ) देण्यात येत आहे.
दि 11 एप्रिल 2025 च्या शासनाद्रारे काढण्यात आलेल्या परीपत्रका नुसार आता कृषि विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभार्थी करिता फार्मर आयडी ओळख पत्र अनिवार्य आहे असे प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे