शहरात पाणीबाणी असताना सर्व्हिसिंग सेंटर ला मात्र नीयमित पाणी पुरवठा
नितेश केराम गडचांदूर राजुरा गोविंदपूर नॅशनल हायवेचे काम जोरात सुरु आहे सदर मार्ग गडचांदूर शहररातून जात असल्याने याठिकाणी मुख्य मार्गांवर जागोजागी खोदकाम करण्यात आले आहे कित्येक ठिकाणी पाइ प लाईन फुटल्याने ऐन उन्हाळ्यात शहरातील काही वा र्डात भीषण पाणी टंचाई असून नगर परिषदेच्या माध्यमातून ट्रॅक्टरद्रारे पाणी पुरवठा केला जात आहेत अशातच नगर परिषद प्रशासनाचा एक प्रताप समोर आला आहे एकीकडे शहरात पाणी बानी असताना दुसरीकडे मात्र एका सर्व्हिसिंग सेंटर ला वाहने धुवायला हजारो लिटर नीयमित पणे पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे नागरिक हंडाभर पाण्यासाठी त्रस्त असताना सर्व्हिसिंग सेंटरला टँकर रिकामा करून दिला जात आहे पाणी टँचाईच्या काळात नगर परिषद व्यवसायीकांना पाण्याचा पुरवठा करू शकते का असा प्रश्न उपस्थित होत असून यामध्ये आर्थिक व्यहार होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही सदर प्रकरणी नगर परिषदेचे वननियुत मुख्यधिकारी यांनी योग्य ती चौकशी करून संबंधितां वर कायदेशीर कारवाई करावी शहरातील पाणी टँनचाईकडे लक्ष देऊन नागरिकांना योग्यरित्या पाणी पुरवठा करावा अन्यथा लोकांना होणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन तीव्र आंदोलन उभारण्याचा संतापजनक इशारा माजी नगर सेवक तथा गडचांदूर भाजपा शहरध्यक्ष अरविंद डोहे यांनी दिली आहे आता मुख्यधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहेत