नराधम दहशतवाद्यांना कठोर शिक्षा द्या :कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटेंची शासनाकडे मागणी
नितेश केराम राजुरा : जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्यात देशाच्या विविध भागातील जवळपास 28 पर्यंटक यांचे नाहक बळी गेले आहेत मृतांमध्ये 6 महाराष्ट्रीयन नागरिकांचा समावेश असल्याचे वृत आहे हें वृत समजताच संपूर्ण महाराष्ट्रात देशात शोककळा पसरली आहे अत्यांत निदनीय आणि संतापजनक अशा या दहशतवादी हल्ल्यानंतर जनमान सात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.
जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येते फिरायला गेलेल्या पर्यंटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले जीव गमावलेल्या सर्व मृतआत्म्याना आणि त्यांच्या कुटुंबीयांना चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी दुःख वेक्त केले आहे.
या घटनेने फक्त मीच नाही तर सम्पूर्ण देशातील जनता व्यथित झाली आहे मृतकांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे असे मनत त्यांनी दहशतवाद्याच्या या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे.
यासाठी जबाबदार असणाऱ्या दहशतवाद्याना कठोर शिक्षा झाली पाहिजे निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या मास्टरमाइंडला शोधून त्यांना कडक शिक्षा दिली जावी अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे अशा प्रकारच्या भ्याड हल्लेला भारत देश कधी घाबरत नाही.
मात्र कडेकोट बंदोबस्त असतांनाही सुरक्षा वेवस्था भेटून निष्पाप पर्यंटकांवर बेछूट गोळीबार करून दहशतवाद्यानी अमानविय कृत्य केले आहे याचा सम्पूर्ण बिमोड करण्याची गरज आता निर्माण झाली असून शासनाने अतिशय गांभीर याने दखल घेऊन देशील दहशतवादाचा आत्मा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.